आपल्या आचरणातून संदेश...

 


(अंक वाचण्यासाठी मुखपृष्ठावर क्लिक करावे)

अमर्याद काळाच्या वाटेवर काही माणसे आपल्या कर्तृत्वाची पाऊले उमटवितात. काहींची ठसठसीत उमटतात तर काहींची पुसटशी. काहींची उमटल्यासारखी वाटतात तर काहींची उमटतच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटविली आहेत.

आपणास जर खरेच जीवनात आणि जगात शांतता पाहिजे असेल तर यांच्या विचाराशिवाय आजतरी पर्याय नाही. आपण आज सैरभैर आणि बधीर झालो आहोत. फक्त पुतळे उभे करून किंवा जयंती साजरी करून काहीच हाती लागणार नाही, तर यांच्या जयंतीनिमित्त तरी आज आपण यांच्या विचारांची कास धरली पाहिजे, ठोस कृती केली पाहिजे.

महामानव डॉ. बाबासाहेब यांनी राजकारण, अर्थशास्त्र, धर्माचिकित्सा, समाजकारण यांविषयी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्या निर्भीड, घणाघाती पत्रकारितेबद्दल फार कमी बोललं – लिहिलं जातं. आजकाल कोणालाही न दुखवता गुळगुळीत लेखन करणारे अनेक आहेत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध घणाघाती प्रहार करीत. त्यांचे लेखन तर्कशुद्ध असे होते. त्यावेळच्या वृत्तपत्रांबाबत ते लिहितात, “महाराष्ट्रातील बरीचशी वर्तमानपत्रे म्हणजे लोकांना मूर्ख बनविण्याचे कारखाने आहेत. व्यवसाय करतांना माध्यमांनी आपले मूलभूत कर्तव्य पाळलेच पाहिजे.”

हल्ली माध्यमे या रस्त्यापासून भरकटत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला योग्य मार्ग दाखवितात, त्यांना मानाचा मुजरा...

प्रश्न हा आहे की, आपण त्यांच्या चरित्रातून काही शिकणार आहोत का? आणि कधी? दिसायला साध्या पण प्रचंड आंतरिक उर्जा असलेल्या बाबासाहेबांचे आपण वारसदार आहोत हे प्रत्येकाने विसरता कामा नये.

          डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेली तत्वे – “शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!!” याबाबत आपण विचार आणि प्रत्यक्ष कृती कधी करणार आहोत?...  

https://drive.google.com/file/d/1__lgkT6jY9bZ3zF8cyUrt-mGNamXs0uG/view?usp=drivesdk 


Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग