संपादकीय... आपल्या दैनंदिन जीवनशैलीत छोटे पण शाश्वत बदल करणे गरजेचे.. दरवर्षी ५ जून उजाडला की , जगभरात एकच लगबग सुरू होते. ' जागतिक पर्यावरण दिन ' साजरा करण्यासाठी शाळेपासून मंत्रालयपर्यंत भाषणे, चर्चासत्रे , वृक्षारोपण दिखाव्याचे कार्यक्रम , चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, घोषणाबाजी आणि झाडे लावा, झाडे लावा या सर्व गोंधळात त्या झाडांचा जीव गुदमरून दुसऱ्या - तिसऱ्याच दिवशी ते झाड मरून जाते. सोशल मीडियावर झाडे लावतांनाचे हिरवेगार फोटो आणि पर्यावरणाचे संदेश स्टेटस म्हणून झळकू लागतात. पण , ६ जून उजाडताच पुन्हा तीच जुनी प्रथा सुरू होते, प्लॅस्टिकचा बेसुमार वापर , कर्कश आवाज, पाण्याचा अपव्यय , कचऱ्याचे ढीग आणि नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष, नालीचे पाणी नदीत सोडणे आणि एकंदरीत निसर्गाकडे आपण दुर्लक्ष करतो. आज आपण अशा वळणावर उभे आहोत , जिथे पर्यावरण रक्षण हा केवळ एका दिवसाचा भाषणाचा उत्सव किंवा केवळ निबंध लिहिण्याचा विषय राहिलेला नाही. ती आज या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची ' करो या मरो ' अशी परिस्थिती बनली आहे. आज एकविसावे शतक विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञा...
संपादकीय... विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण शाळेतच मिळाले पाहिजे पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव व प्रयोगातून प्रत्येक विद्यार्थी शिकत असतो. प्रयोगातून घेतलेले शिक्षण चिरकाल स्मरणात राहते तसेच यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांच्यातील जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होते. यातूनच नवीन कल्पक, उद्योजक, कलाकार घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमधील कलागुण व सर्जनशीलतेला वाव मिळतो. प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होऊन कसे चालेल? शाळेतील कार्यानुभव, चित्रकला, हस्तकला, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, स्व:विकास, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय शिक्षण हे खरे तर विद्यार्थ्यांमधील कलाकाराला साद घालणारे विषय आहेत. हे सर्व विषय व्यवस्थित शिकविले गेल्यास अनेक उद्योजक, कलाकार तयार होतील पण खरच आजकाल हे विषय शाळेत प्रभावीपणे शिकविले जातात का? शाळा ही फक्त परीक्षार्थी बनवायची इमारत नसून विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम ती करीत असते. आजही विद्यार्थ्यांना चित्रकला, कार्यानुभव आदी तास आवडतात पण दुर्दैव असे की एकतर या विषयांना शिक्षकच नसतात त्यामुळे या तासांना गणित, इं...