Skip to main content

डिप्लोमा इन इंजिनिअरींग – तंत्रनिकेतन

 *नोकरीचा राजमार्ग*

*डिप्लोमा इन इंजिनिअरींग – तंत्रनिकेतन

*

*उदिष्टे :* पारंपारिक शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे इंजिनिअरींग डिप्लोमा (पदविका) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सद्या वाढत आहे. कुशल इंजिनीअर तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे तंत्रनिकेतनचे उदिष्ट.

*व्याप्ती :* राज्यात प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खासगी तंत्रनिकेतने आहेत. राज्यात एकूण तीनशे अठ्ठ्यात्तर शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतने आहेत. यात सुमारे 4० प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 17 हजार 759 तर खासगी तंत्रनिकेतनमध्ये 90 हजार 282 जागा उपलब्ध आहेत. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी 387 तंत्रनिकेतनमध्ये 82 हजार 275 जागा उपलब्ध आहेत.

*शैक्षणिक अर्हता :* 35 टक्के गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदविकेच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळतो. इयत्ता बारावी विज्ञान/टेक्निकल/व्होकेशनल विषय घेऊन उत्तीर्ण झाल्यास किंवा दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.

*कालावधी :* पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा असून पदविकानंतर सीईटी/जेईई यासारखी कोणतीही प्रवेश परीक्षा न देता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी शाखेत (इंजिनिअरिंग पदवी) प्रवेश घेता येतो.  

*आवश्यक कागदपत्रे :* शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, द्वितीय वर्षात प्रवेश घ्यायचा असल्यास बारावी/आयटीआयची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी. 

*उपलब्ध अभ्यासक्रम :* तंत्रनिकेतनमधील सर्व अभ्यासक्रम तीन वर्षांचे आहेत. त्यात स्थापत्य, यंत्र, विद्युत, संगणक, अणुविद्युत, माहिती तंत्रज्ञान, रसायन, खनिकर्म, वस्त्रनिर्माण, ड्रेस डिझायनिंग, उत्पादन, प्रिंटींग, उपकरणीकरण आदींसारखे सुमारे 40 प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

*आरक्षण व सुविधा :* पदविका अभ्यासक्रमांत सरकारी नियमाप्रमाणे प्रत्येक प्रवर्गासाठी तसेच  मुलींना 3० टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे. तसेच माध्यमिक शाळेतच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदविकाच्या सर्व अभ्यासक्रमांत 15 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीना प्रवर्गानुसार वार्षिक वसतिगृह निर्वाह भत्ता 8000 ते 30000 रुपये असतो. एस टी सवलत पास, वैद्यकीय सुविधा, आदी. देण्यात येतो.

 https://mahadbtmahait.gov.in 


या संकेतस्थळावर अर्ज केल्यास अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 25000 रुपये शिष्यवृत्ती मिळते.

प्रवेश प्रक्रिया व *संकेतस्थळ :* राज्यातील पदविका प्रवेशासाठी शासनामार्फत ऑनलाईन सामायिक प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक तंत्रनिकेतनसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसते. शासकीय/खासगी तंत्रनिकेतनची यादी आणि अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक पात्रता, इतर नियम  

www.dtemaharashtra.gov.in 

या संकेतस्थळावर दहावी निकालानंतर उपलब्ध असते.

तंत्रनिकेतन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग प्रवेश *माहितीपुस्तिका :*

 https://drive.google.com/file/d/1WPAqq-uJ94ZOQIUFJJxllo_3Y2reP9Z7/view?usp=drivesdk 

यावर उपलब्ध आहे.

*संधी व फायदे :* सरकारी किंवा खासगी क्षेत्रात कनिष्ठ अभियंता/निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते. किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. अभियंता पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यास खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध आहे. तंत्रनिकेतनमधील कँपस इंटरव्हूच्या माध्यमांतून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सरासरी वार्षिक पाच ते आठ लाख रुपये विदेशात पगार दिला जातो. मुंबई, पुणे, नाशिक येथील कंपन्यांमध्ये अनुभवानुसार प्रतिमाह पंधरा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो...

*संपादक मधुकर घायदार, नाशिक यांचा सविस्तर लेख वाचा आजच्या शिक्षक ध्येय मध्ये...*

सामिल व्हा.. टेलीग्राम

https://t.me/shikshak_dhyey

Comments

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...