Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 24 नोव्हेंबर 2025




संपादकीय...

 

 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गरजेचे

           

            भारतातील शिक्षणव्यवस्थेत २४.६९ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यापक स्तरावर पोहोचविणे आवश्यक आहे. एका सर्वेनुसार तिसरीत केवळ ५५ टक्के विद्यार्थी ९९ गुणांपर्यंत गुण मिळवू शकले; तर नववीत फक्त ३१ टक्के विद्यार्थीच अपूर्णांक आणि दशांश यांसारख्या संकल्पना योग्यरीत्या वापरू शकले.

UDISE+ (Unified District Information System for Education+) २०२४ २५ च्या आकडेवारीनुसार, भारतात १ लाखांहून अधिक शाळांमधे फक्त एकच शिक्षक आहे. याशिवाय, शिक्षकांचा मोठा वेळ शिक्षणाशी थेट संबंधित नसलेल्या कामांमध्ये खर्च होतो. जसे की प्रशासनिक कागदपत्रे, नोंदी ठेवणे, सर्वेक्षणे करणे आणि अहवाल तयार करणे.

आज शाळांमध्ये तंत्रज्ञानाने आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. याचा स्वीकार झाल्यामुळे सहकार्याच्या नवीन शक्यता आणि विचारांची देवाणघेवाण साधता येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर, AI साधने शिक्षकांना मोठा आधार देऊ शकतात. ही साधने पाठांचे नियोजन, रोजच्या कामांमध्ये मदत, अभ्यासांचे मूल्यमापन आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण अशा कार्यांमध्ये मदत करू शकतात. त्यामुळे शिक्षकांचा अशैक्षणिक कामांवर जाणारा वेळ कमी होतो आणि ते अधिक प्रभावी अध्यापनासाठी वेळ देऊ शकतात. McKinsey च्या अहवालानुसार, तंत्रज्ञान शिक्षकांचा 20-30 टक्के वेळ वाचवू शकते, तो वर्गात शिकविण्यासाठी वापरता येऊ शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनविण्याच्या नव्या शक्यता निर्माण करते. हा राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 चा एक प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल जगात आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने पुढे जाण्यास मदत करत आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार इयत्ता तिसरीच्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांना आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय)  म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील धडे शिकवले जाणार आहेत. त्यासंदर्भातील निर्णयही केंद्रानं घेतला आहे. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गांपर्यंत एआय आधारित विषय शिकवला जात आहे.  उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात २०२६ – २७  पासून AI हा विषय समाविष्ट केला जाईल. 

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे एक विकसित होत जाणारे तंत्रज्ञान आहे. पारंपारिक शिक्षणासोबतच आता शिक्षकांनीही हे नवे तंत्रज्ञान शिकून घेणे गरजेचे आहे. भारतात AI-आधारित शिक्षणाचे भविष्य राजकीय धोरण, साधनांची उपलब्धता आणि शिक्षक यांच्या एकत्रित सहभागावर अवलंबून आहे.

 संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येयचा अंक वाचण्यासाठी ..... 

इथे क्लिक करा.... CLICK HERE  


Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...