Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय २५ ऑगस्ट २०२५

 



संपादकीय...

 

सर्वांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे

 

राज्यात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी व शहरी व ग्रामीण भागात मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक योजना राबविल्या जातात. शैक्षणिक शुल्क माफ, मोफत युनिफॉर्म, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, बसभाड्यात सवलत यासारख्या अनेक योजना राबवूनही दुर्दैवाने राज्यात अजूनही शिक्षण घेण्यात मुलींचे प्रमाण कमीच असल्याचे जाणवते.  नुकत्याच प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात लैंगिक भेदभावाच्या बाबतीत १४६ देशांमध्ये भारताचा क्रमांक १२६ वा आहे. त्या बाबतीत भारत देश बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानच्याही मागे आहे.

सरकारचे सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत; पण, भारतात अजूनही मुलींच्या शिक्षणाचा आकडा सर्वात कमी दिसतो. १९९१ च्या जनगणनेनुसार, ७ वर्षांवरील मुली आणि महिलांची संख्या ३३ कोटी होती. त्यापैकी ४० % अशिक्षित होत्या. त्यावरुन असे लक्षात येते की सुमारे १४ कोटी महिला अशिक्षीत किंवा कमी शिक्षित होत्या.

           मुलीला शिक्षित करणे हे बहुधा अनावश्यक म्हणून समजले जाते. मुले त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिकत असताना, मुलींना घरातील कामात मदत करण्यासाठी, लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लहानपणापासूनच शाळेपासून दूर ठेवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. अनेक कुटुंबांना आपल्या मुलींना शिक्षण द्यावे असे वाटत नाही कारण त्यांच्या शालेय शिक्षणाचा खर्च तसेच त्यानंतर शिक्षित मुलींना द्यावा लागणारा हुंडा. मुलीं लग्नानंतर दुसऱ्यांच्या घरी जात असल्याने, मुलींना शिक्षण देण्यासाठी पैसे ‘वाया घालवणे’ असे पालकांना वाटते, कारण तिच्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला भविष्यात होणार नाही.

महिला सबलीकरणाच्या योजनांच्या माध्यमातून स्त्रीवर्गाच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचा गाजावाजा महाराष्ट्र सरकार करत असले तरी वस्तुस्थिती मात्र फारच वेगळी आणि विदारक आहे. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालातून राज्यात उच्च शिक्षण घेणा-या मुलींचे प्रमाण केवळ 16.9 टक्के असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
शिक्षणाबाबत मुले-मुलींदरम्यान भेदभाव बाळगणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर वरचा आहे. या सर्वेक्षणात बारावीनंतरच्या शिक्षणाचा म्हणजेच पदवी, पदविका, पॉलिटेक्निक व नर्सिंग शिक्षण घेणा-या मुला-मुलींचा समावेश होता.

संपूर्ण अंक वाचण्यासाठी...

इथे क्लिक करा.. CLICK HERE 



Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...