Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 ऑगस्ट 2025

 


संपादकीय...

 

आदर्श शिक्षण पद्धती कशी असावी?

 

स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार ज्ञान हे बाहेरून येत नसून ते आतच असते. त्या ज्ञानाची जाणीव करून देणे म्हणजे शिक्षण. ज्ञानाची जाणीव करून देणारा तो ‘शिक्षक’.

शिक्षणातून काय साध्य करायचे आहे? विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? आदर्श शिक्षण पद्धती कशी असावी? हे लक्षात घेतल्याशिवाय उत्कृष्ठ शिक्षक निर्माण होणे शक्य नाही.

ज्ञान देणारा, त्या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर करणारा, जीवनात उपयोगी पडणारे शहाणपण शिकविणारा शिक्षक अभावानेच पाहायला मिळतो. शालेय जीवनातील शिक्षण हे जीवन जगताना कसे वापरावे? हे शिक्षकाच्या ध्यानीही नसते.

शिक्षणाचा मुख्य उद्देश संस्काराचे बीज रोपण करणे हा आहे. निरीक्षण, अनुभव, अभ्यास हे शिक्षणाचे तीन आधारस्तंभ आहेत. निरीक्षण करून विचार करण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजे कारण प्रश्न पडल्याशिवाय आपण विचार करीत नाही आणि विचार केल्याशिवाय प्रश्न पडत नाही म्हणून विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्याकडे शिक्षकांनी लक्ष दयायला हवे. आपला विद्यार्थी अधिक प्रश्न विचारू लागला तर शिक्षकाला आनंद झाला पाहिजे. पण सद्या प्रत्यक्षात वर्गात असे घडते का?

शिक्षकाने उत्कृष्टतेचा ध्यास, नवीन शिकण्याची आवड, भरपूर वाचन, श्रवण, मनन करायला हवे. उत्तुंगतेची आस आणि जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद शिक्षकात हवा.

दररोज चाळीस मिनिटे पाठ्यपुस्तकातील माहितीचा पुरवठा करणे, पाठ्यपुस्तकापुरता शिक्षक, विषयापुरता शिक्षक हा दृष्टीकोन आता बदलायला हवा. नव नवीन तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा उपयोग शिक्षकांनी आपल्या शिकविण्याच्या प्रक्रियेत केला पाहिजे. मोबाइल, विविध शैक्षणिक अॅप, प्रोजेक्टर, पेन ड्राइव्ह, स्मार्ट टीव्ही इत्यादी अनेक साधने शिक्षकांना हाताळता यायला हवे. ‘माझे फक्त २-४ वर्षे राहिलेत.. मी आता कश्याला शिकू?’ ‘मी फक्त माझा विषय शिकवेन’ ही वृत्ती शिक्षकांनी आता सोडायला हवी. विद्यार्थ्यांना माहिती पुरविणारा शिक्षक स्वत:ला आदर्श शिक्षक समजतो, हेच या देशाचे दुर्दैव आहे...?

संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

इथे क्लिक करा.. CLICK HERE 




Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...