Skip to main content

आज रक्षाबंधन किती वाजता साजरे करावे? पं. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी

 


बुधवारी करावे रक्षाबंधन साजरे: पं. डाॅ श्री. प्रसादशास्त्री कुळकर्णी

येवला जिल्हा नाशिक=

 यावर्षी रक्षाबंधन सणाबाबत लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे, तोच संभ्रम दूर करण्याबाबत पंचांग अभ्यासक पं.डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी सांगितले की,३०ऑगस्ट बुधवारी रक्षाबंधन साजरी करावी.  या वर्षीची नारळीपौर्णिमा ३० आणि ३१ऑगस्ट  या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमक्या कोणत्या दिवशी साजरे करावे याबाबत संभ्रम आहे . रक्षाबंधन हा सण दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन ओळखले जाते.रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र यावेळी बहुतेक जणांच्या मनात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, नेमके रक्षाबंधन कधी साजरे करायचे?वास्तविक यावेळी पौर्णिमा तिथी (रक्षाबंधन २०२३ तारीख) ३० आणि ३१ या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी राखी बांधली जाईल हे लोकांना समजत नाही.

अधिक श्रावणामुळे यंदा सर्वच सणांच्या तारखांचा गोंधळ सुरु आहे. परिणामी रक्षाबंधन सुद्धा ३० की ३१ ऑगस्टला आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय.

श्रावण पौर्णिमा तिथी ही मुळात ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०: ५८ वाजता सुरू होते आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०५ वाजता समाप्त होते. यामुळेच रक्षाबंधनाच्या तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बुधवारी रक्षाबंधन साजरे करावे आणि बहिणीने ३० ऑगस्ट बुधवारी दिवसभरात केव्हाही भावाला राखी बांधून हा सण आनंदाने साजरा करावा. यज्ञविधान करून राखी (रक्षासूत्र)बांधले तरच भद्रा बाबत नियम पाळावे लागतात. हल्ली आपण राखी बांधून सण साजरा करतो ;त्यामुळे भद्रा काळ बघण्याची गरज नाही;असे पं.डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडिओ बघा..

https://youtu.be/bh9gfLvad4E?si=GDQOedyj29f4gBW5


रक्षाबंधन विशेषांक वाचण्यासाठी ..

CLICK HERE






Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...