Skip to main content

तृतीय वर्धापन दिन विशेषांक 20 एप्रिल 2023

 



संपादकीय...

काळानुसार शिक्षक बदलला... तरच विद्यार्थी बदलतील...

            साप्ताहिक ‘शिक्षक ध्येय’ हा तृतीय वर्धापन दिन विशेषांक आपल्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आज राज्यात 2200  महाविद्यालये, 19 हजार 767 माध्यमिक शाळा आणि 75 हजार 466 प्राथमिक शाळा आहेत. राज्यात शिक्षक आणि प्राध्यापकांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. विद्यार्थी संख्या तर सुमारे दीड कोटी आहे. राज्यात विविध शासकीय शाळा जसे की आश्रमशाळा, जिल्हा परिषद प्रशाला, महानगर पालिका शाळा तसेच विविध खासगी शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा सुरु आहेत. जागतिक स्तरावर शिक्षण केंद्रांच्या आकडेवारीत आपला देश तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

             राज्यातील अनेक शाळांत जे जे चांगले घडत आहे, परिवर्तन दिसत आहे, विद्यार्थी यशाची शिखरे सर करीत आहे, येथील शिक्षक नवीन उपक्रम राबवीत कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहे, यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, उत्कृष्ठ शाळेतील आजचे खरे वास्तव समाजासमोर यावे यासाठीच या साप्ताहिकाची निर्मिती करण्यात आली आहे. आज अंकाचे सुमारे 3 लाखापेक्षा जास्त वाचक आहेत. किंबहुना राज्यातील प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाकडे हे पोहचले पाहिजे असा प्रयत्न आम्ही करीत आहोत.   

            नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून लागू होईल. शैक्षणिक धोरणात कला, व्यावसायिक शिक्षण, पौढ शिक्षण, जल व्यवस्थापन, वाहतूक सुरक्षा, योगा, शेती तंत्रज्ञान आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश करणे आवश्यक आहे. इतर देशात व्यावसायिक शिक्षण शाळेतच दिले जाते. अमेरिकेत 52 टक्के, जर्मनीत 75 आणि कोरियात 96 टक्के विद्यार्थी शाळेतच व्यवसायाचे धडे गिरवतात. भारतात हेच प्रमाण अवघे 5 टक्के आहे.

            काळानुसार शिक्षक बदलला तरच विद्यार्थी बदलतील.

            आज बऱ्याच शाळा डिजिटल झालेल्या आपण पाहतो. डिजिटल खोली, फर्निचर, रंगरंगोटी, विद्युत झगमगाट केला म्हणजे शाळा डिजिटल होत नाही. आजही काही शाळा डिजिटल असूनही तिथे विद्युत जोडणीच नाही तर काही ठिकाणी संगणक असूनही वापर नाही. काही ठिकाणी डिजिटल रुममध्ये विद्यार्थ्यांनाच प्रवेश नसतो. खर तर डिजिटल ई-क्लास, ई-लर्निंग हे सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययनास पूरक आहे. शासन, साहित्य, सुविधा यांवर उणिवांचे खापर न फोडता प्रत्येक शिक्षकाने ‘विद्यार्थी घडविणे’ हेच ध्येय बाळगावे, हीच एक माफक अपेक्षा!

            नेहमीच साप्ताहिकातील विविध लेखांच्या माध्यमांतून विविध शाळांमधील अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी याचे कार्य व यश समाजापुढे प्रस्तुत करणे याच उद्देशाने हे शिक्षक ध्येय साप्ताहिक सुरु करण्यात आले आहे.

तृतीय वर्धापन दिन विशेषांकाचे सर्वांकडून स्वागत होईल आणि आपल्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे.

अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

CLICK HERE 


Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...