Skip to main content

शिक्षक ध्येय २८ नोव्हेंबर २०२२

 



संपादकीय...

वाचायलाच हवे...

वाचाल तर विचार बदलतील, विचार बदलले तर स्वभाव बदलेल, स्वभाव बदलला तर सवयी बदलतील, सवयी बदलल्या तर व्यक्तिमत्व बदलेल आणि व्यक्तिमत्व बदलले तर भवितव्य घडेल, म्हणून नेहमी वाचन करावे.   
~~~शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर

शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मनाला वाचनाची. आज आपण जागतिक पुस्तक दिन, वाचन प्रेरणा दिन, ग्रंथालय दिन, ग्रंथ दिंडी यासारखे अनेक उपक्रम साजरे करतो तरी यामागील मुख्य उद्देश लक्षात येत नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

थोर इतिहासकार गिबन म्हणाले होते, ‘देशातली सगळी संपत्ती जरी माझ्या पायाशी ओतली तरी माझे वाचनप्रेम मी सोडणार नाही.’ पुस्तकांप्रती आपली सर्वांची अशीच श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. आपल्या अवांतर वाचनामुळे मतपरिवर्तन होऊ शकते. आज उच्च पदाची नोकरी जे करीत आहेत त्यांच्या जीवनात वाचनाचा फार मोठा वाटा आहे. हा वैचारिक, आर्थिक, सामाजिक, सकारात्मक बदल फक्त वाचनामुळे घडून येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज अवांतर वाचन केलेच पाहिजे. वाचनामुळे समुपदेशनाची, सल्ल्याची गरज पडत नाही. म्हणून दिशाहिन झालेला समाज एकत्रित येऊ शकतो इतकी क्षमता वाचनामध्ये आहे.

शब्द आयुष्य घडवतात, बिघडवतात. शब्द प्रेरणा देतात, शब्द यश देतात, शब्द नातं देतात, शब्द प्रेम देतात, शब्द आयुष्यभर आणि नंतरही मनामनात भावना जपतात. म्हणून शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं. हे फक्त वाचनामुळे शक्य होतं. आज डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या प्रसारामध्ये आपण वाचन विसरलो आहे. उत्कृष्ठ, दर्जेदार साहित्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे. पण आजची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.

आजकाल लोकं काहीही वाचतात. बऱ्याच जणांना तर काय वाचावं हेही कळत नाही. पत्रकारांना – का, कधी, काय, कुठे, कसं, केव्हा, कोण असे प्रश्न शिकवले जातात. खरं तर हे प्रश्न सर्वांनाच पडायला हवे. वाचनाने एका नाण्याच्या दोन्ही बाजू आपणास कळतात. त्यातलं खरं काय नि खोटं काय? हे आपल्यालाच आपल्या बुद्धीने ठरवता येतं आणि हे ठरवता आलं की आपण व्यक्त होतो.           सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्वतःच्या विकासासाठी तरी ज्ञानार्जन, वाचन करावे… कारण आपण शिकलो, वाचते झालो तर समाज नक्कीच सुधरू आणि सुधारू शकतो…

साप्ताहिक शिक्षक ध्येय दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ चा अंक वाचण्यासाठी ...

CLICK HERE






Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर

  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर  महाराष्ट्रातील 45 जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आदि 15,631 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025. 32 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz