Skip to main content

मी गणपती बाप्पा बोलतोय...

 


छोट्या भक्तांनो.....

मी तुमचा गणपती बाप्पा। माझ्या स्वागताची तयारी जोरात चालली असेल, हो ना? इकडे उंदीर मामा सुद्धा घाई करीत आहेत, "चला बाप्पा, आपले लाडके भक्त आपल्याला बोलावीत आहेत" असं तो म्हणतोय. कारण त्यालाही गोडधोड खायला मिळते ना म्हणून.... तो घाई करतोय.

पण मुलांनो मी पृथ्वीतलावर आल्यावर दहा दिवस तुमच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा तुमचे मागणे ऐकत असतो,

त्याआधी माझ्या मनातील माझे गार्‍हाणे या पत्राद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ऐकाल ना तुम्ही? वाचाल ना माझे पत्र? माझी कित्येक नावे रूपे वेगवेगळी असली तरी मी एकच आहे, एकसमान आहे. अष्टविनायकाचे रूप असो किंवा लालबागचा राजा असो माझा हा गणेशोत्सव तुम्ही गाजावाजा न करता, श्रद्धा भक्तीनेगर्दी न करता शांततेत साजरा करावा असे मला वाटते.जबरदस्तीने वर्गणी गोळा करून तुम्ही नैवेद्याला गोड-धोड करत अवास्तव पैसा खर्च करण्यापेक्षा ती रक्कम सत्कारणी लावा. नैवेद्याचे म्हणाल तर घरच्या घरी केलेल्या मोदकांवर साजूक तूप नसेल तरीही खरोखरच माझे पोट समाधानाने भरते रे!

कर्णकर्कश् गाणी लावून माझे कान अजून मोठे करण्यापेक्षा तुमच्या कंठामधून गायलेली सुमधुर भक्तीगीते मला ऐकायला आवडतील, त्यामुळे तुमचे पाठांतर वाढेल. तुमचे वाचनही वाढेल. कोरोना काळात तुमचं वाचन, लेखन पाठांतर फार कमी झालंय. अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही आळशी झालात. अभ्यास वाढवा, विद्येची पूजा म्हणजेच माझी पूजा. माझ्या छोट्याशा डोळ्यांमधून मला न पाहणारी ही नाच-गाणी आता तुम्हीच थांबवली पाहिजेत. मी तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तर आहेच पण तुमच्या जोपासलेल्या कला, त्याचे सुंदर दर्शन या दहा दिवसात माझ्या कृष्णपिंगाक्ष डोळ्यांना झाल्यास मी तर धन्य होईल रे, बाळांनो!

मुलांनो, या दहा दिवसात तुम्ही मनोभावे माझी केलेली पूजा, आरती, समाजोपयोगी कार्य त्यातूनच मला प्रेमाने ओथंबलेला नमस्कार मिळतो. सण-उत्सवाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी, सोन्याचांदीचे दागिने प्रदर्शन, नाचगाणे करून सर्व वातावरण प्रदूषित करण्यापेक्षा पर्यावरण संवर्धन करा. प्रचंड प्रमाणावर वाढत चाललेला ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण थांबवा. तुम्ही माझी मनोभावे प्रार्थना करत आपले प्रत्येक काम प्रामाणिकपणे नियम पाळून करत राहा, गरजू लोकांच्या उपयोगी पडा, माझ्यासारखे तुम्हीही आई-बाबांचे थोरामोठ्यांचे ऐका, फक्त दहा दिवसच नाही तर आयुष्यभर मी तुमच्यासोबत आहे.

चला आता येऊ का? माझी आई बोलावित आहे मला.... मी आता दहा दिवस तुमच्या सोबत राहणार म्हणून तिलाही माझी काळजी वाटते रे! पण तुम्ही, मी सांगितल्याप्रमाणे छान तयारी करा हं!

येतोय मी!

 

गणपती बाप्पा.....

तुमचाच

बाप्पा


लेखन: सौ. नर्मदा नरेश कनकी, सोलापूर.

खालील लिंकवर अंक उपलब्ध आहे

अंक वाचण्यासाठी..

. CLICK HERE




Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...