Skip to main content

आयटीआयचे ऑनलाइन प्रवेश सुरु

 



राज्यातील आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश 

एक लाख ४९ हजार २६८ जागांसाठी प्रक्रिया सुरु


मधुकर घायदार : सकाळ वृत्तसेवा


कनाशी, ता. १७ : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील ४१९ शासकीय व ५५३ खासगी आय टी आय मध्ये एकुण १ लाख ४९ हजार २६८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे दरवर्षी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. यावर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्यापुर्वीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केले आहे.

नाशिक मधील सातपुर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २३ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या २२०० जागांसाठी तर त्र्यंबकनाका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे ११ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या ४३० जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहे.

एकुण चार फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

सर्व आयटीआय मध्ये अर्ज स्वीकृति केंद्र असून या केंद्रावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृति व निश्चिती करू शकतील. प्रवेशाचा सर्व तपशील माहितीपुस्तिका संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शन मध्ये आहे. प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावा. माध्यमिक शाळेत व्यवसाय शिक्षण हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावा. 


आयटीआय प्रवेश वेळापत्रक


ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे : प्रारंभ १७ जून


प्रवेशअर्जांची निश्चिती करणे : प्रारंभ २२ जून 


इयत्ता दहावीची गुणपत्रिका वितरित करण्यात आल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल.


प्रवेश अर्ज शुल्क


खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी: १५० रुपये


राखीव प्रवर्गातील विद्यार्थी: १०० रुपये


राज्याबाहेरील विद्यार्थी: ३०० रुपये


अनिवासी भारतीय विद्यार्थी: ५०० रुपये


विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरुन त्याची प्रत घ्यावी. सर्व आवश्यक मुळ कागदपत्रासह जवळच्या आयटीआय मध्ये जावून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची पावती दिली जाईल. अर्ज स्वीकृति केंद्रावर निश्चित केलेल्या अर्जाचाच सर्व प्रवेश फेरीसाठी विचार करण्यात येइल, असे कळविण्यात आले आहे.



https://chat.whatsapp.com/E9aTFMQy13sCFHsqog2pd2

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...