Skip to main content

आयटीआयचे तीन विषयांचे एकत्रीकरण

 


आयटीआयचे तीन विषयांचे एकत्रीकरण

इडी, डब्लूसीएस आणि थेरीची एकच १०० गुणांची परीक्षा


मुंबई: देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील तीन विषयांचे एकत्रीकरण करून यापुढे एकच पेपर घेतला जाणार आहे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक दि. अं. दळवी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

     औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील फिटर, टर्नर, मशिनिष्ठ, वेल्डर या सारख्या इंजिनिअरिंग ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी सद्या इंजिनिअरिंग ड्रॉईंग (इडी), वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स (डब्लूसीएस) आणि ट्रेड थेरी असे तीन वेगवेगळे विषय शिकतो. या तिन्ही विषयांची परीक्षा देखील वेगवेगळी घेतली जाते. ज्यात इडी चा पेपर ५० गुणांचा, डब्लूसीएसचा पेपर ५० गुणांचा आणि ट्रेड थेरीचा पेपर १०० गुणांचा घेतला जातो. या वर्षांपासून तिनही विषयांची एकत्रित १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. 

यंदा २०२१-२२ मध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे, त्यांना हा नियम लागू होणार आहे. 

मात्र यापूर्वी इडी, डब्लूसीएस आणि  थेरी या विषयांतील अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थीसाठी जुन्याच पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. देशभरातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या सर्वांना हा निर्णय लागू राहील असे पत्रकात नमूद केले आहे.

*महत्त्वाचे

सद्या इडीचा पेपर ५० गुणांचा, डब्लूसीएसचा पेपर ५० गुणांचा, ट्रेड थेरीचा पेपर १०० गुणांचा आणि निदेशक अंतर्गत सत्र गुण इडीसाठी २० गुण, डब्लूसीएससाठी १० गुण, ट्रेड थेरीसाठी २० गुण असा एकूण २५० गुणांसाठी हे तीन विषय होते.

 हे तिन्ही विषय एकत्र करून १०० गुणांचे करण्यात आले आहे. ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चालू सत्रासाठी प्रवेश घेतला आहे त्यांना जुलै/ऑगस्ट २०२२ मध्ये इडी व डब्लूसीएससाठी स्वतंत्रपणे पेपर देण्याची आवश्यकता नाही.

शासकीय पत्र वाचण्यासाठी... CLICK HERE

बातमी वाचण्यासाठी...CLICK HERE



Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...