Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय १ मे महाराष्ट्र दिन विशेषांक

 



संपादकीय...

जीवनाचा खरा मार्ग...


फक्त शिक्षण मिळवून किंवा डिग्रीचा कागद मिळाला की देश सुधारत नाही तर आपल्या नसानसातून, धमन्यांमधून माणुसकी, आपुलकी आणि सौजन्य दिसून यावे. सहा आकडी पगार मिळाला की फक्त एक कुटुंब सुखी होईल पण माझ्यासोबत माझा प्रत्येक भारतीय मित्र सुखी झाला किंवा सुखी व्हावा म्हणून आपण हातभार लावला तरच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे सार्थक होईल.

          आजही देशसीमेवर सैनिक डोळ्यांत प्राण आणून आपले रक्षण करत आहेत. त्यांनी कोत्या विचारांनी आपले रक्षण करणे बंद केले तर! तर काय होईल याचे कल्पनाही करवत नाही. देशाच्या शत्रूचा सहजच देशात प्रवेश होईल. मग स्वातंत्र्य कसे अबाधित राहणार! सगळीकडे अंदाधुंदी माजेल. देशाचा पोशिंदा शेतकरी दिवस-रात्र काळ्यामातीत राबत असतो. आपल्यासाठी धान्य, फळं, भाज्या पिकवित असतो. शेतकऱ्याने आपल्यापुरतेच धान्य पिकविण्याचे ठरविले तर सारा देशच उपाशी राहील. अन्नधान्य मिळणे दुरापास्त होईल. म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो हा विचार प्रत्येकाने केला तरच आणि त्यादृष्टीने प्रयत्न केला तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल. देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याचे, साक्षर झाल्याचे सार्थक होईल. स्वार्थी वृत्तीचा त्याग करून निरपेक्षपणे कार्य करत राहिला, माणुसकीचे दर्शन दिले तर देशाची सुव्यवस्था सुरक्षित राहील.          आपणाला संतांनी समता, बंधुता, न्याय आणि शांती यांचे धडे दिले आहेत. त्यांनी आपल्या अभंग कीर्तनातून जन माणसांच्या मनावरील मळभ दूर केले आहे. संत ज्ञानेश्वर, निवृत्ती महाराज, सोपानदेव, नामदेव, तुकाराम, रामदास, चोखामेळा, सावता माळी, गोरा कुंभार अशा थोर संत विभुतींनी आपल्याला जीवनाचा खरा मार्ग दाखवला आहे.

          शेवटी काय रिक्त हस्ताने जन्माला आलो आणि शेवटचा मार्ग रिक्त हस्तानेच पार पाडायचा आहे हेच मनुष्याच्या जीवनाचे सत्य आहे. मग पैशाचा, काळ्याबाजाराचा आणि लोभी वृत्तीचा हव्यास कशाला हवा?


अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

CLICK HERE






Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...