Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय १ मे महाराष्ट्र दिन विशेषांक

 



संपादकीय...

जीवनाचा खरा मार्ग...


फक्त शिक्षण मिळवून किंवा डिग्रीचा कागद मिळाला की देश सुधारत नाही तर आपल्या नसानसातून, धमन्यांमधून माणुसकी, आपुलकी आणि सौजन्य दिसून यावे. सहा आकडी पगार मिळाला की फक्त एक कुटुंब सुखी होईल पण माझ्यासोबत माझा प्रत्येक भारतीय मित्र सुखी झाला किंवा सुखी व्हावा म्हणून आपण हातभार लावला तरच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे सार्थक होईल.

          आजही देशसीमेवर सैनिक डोळ्यांत प्राण आणून आपले रक्षण करत आहेत. त्यांनी कोत्या विचारांनी आपले रक्षण करणे बंद केले तर! तर काय होईल याचे कल्पनाही करवत नाही. देशाच्या शत्रूचा सहजच देशात प्रवेश होईल. मग स्वातंत्र्य कसे अबाधित राहणार! सगळीकडे अंदाधुंदी माजेल. देशाचा पोशिंदा शेतकरी दिवस-रात्र काळ्यामातीत राबत असतो. आपल्यासाठी धान्य, फळं, भाज्या पिकवित असतो. शेतकऱ्याने आपल्यापुरतेच धान्य पिकविण्याचे ठरविले तर सारा देशच उपाशी राहील. अन्नधान्य मिळणे दुरापास्त होईल. म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो हा विचार प्रत्येकाने केला तरच आणि त्यादृष्टीने प्रयत्न केला तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल. देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याचे, साक्षर झाल्याचे सार्थक होईल. स्वार्थी वृत्तीचा त्याग करून निरपेक्षपणे कार्य करत राहिला, माणुसकीचे दर्शन दिले तर देशाची सुव्यवस्था सुरक्षित राहील.          आपणाला संतांनी समता, बंधुता, न्याय आणि शांती यांचे धडे दिले आहेत. त्यांनी आपल्या अभंग कीर्तनातून जन माणसांच्या मनावरील मळभ दूर केले आहे. संत ज्ञानेश्वर, निवृत्ती महाराज, सोपानदेव, नामदेव, तुकाराम, रामदास, चोखामेळा, सावता माळी, गोरा कुंभार अशा थोर संत विभुतींनी आपल्याला जीवनाचा खरा मार्ग दाखवला आहे.

          शेवटी काय रिक्त हस्ताने जन्माला आलो आणि शेवटचा मार्ग रिक्त हस्तानेच पार पाडायचा आहे हेच मनुष्याच्या जीवनाचे सत्य आहे. मग पैशाचा, काळ्याबाजाराचा आणि लोभी वृत्तीचा हव्यास कशाला हवा?


अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....

CLICK HERE






Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...