Skip to main content

शिक्षक ध्येय 30 जानेवारी 2023

 


संपादकीय...

राष्ट्रपिता...


झाले बहु l आहेत बहु ll

होतील बहु l परंतु यासम हा ll

असे वर्णन ज्यांचे करता येईल ते म्हणजे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी! जगातील सर्वात जास्त चर्चेतलं, ओळखीचं, लेखकांना-विचारवंतांना बौद्धिक खुराक पुरवणारं नाव तसेच ७० देशात असलेले त्यांचे पुतळे १५० च्या वर जगातील देशांनी त्यांच्या स्मरणार्थ काढलेले टपाल तिकीटं, महात्माजींच्या कार्याची थोरवी सांगताना प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणाले होते की, ‘आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वास बसणार नाही की असा कधी कोणी माणूस झाला होता.’

               'सत्याग्रह' हा अधिक शाश्वत आणि चिरायू असा मार्ग आहे. 'सत्य' आणि 'अहिंसेच्या' मिलनातून निर्माण झालेले ते अत्युच्च सामर्थ्य होय.

रविंद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना 'महात्मा' ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने 'बापू' म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता ही म्हटले जाते.

               गांधीजी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांनी आपल्या देशासाठी अनेक महान कार्य केली. ध्येय वेडाने मनुष्य प्रेरित झाल्यावर सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व कसे फुलू शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी होय.

असेच देशहितासाठी देह झिजवत असताना ३० जानेवारी, १९४८ रोजी राष्ट्रपित्याची एका माथेफिरूने हत्या केली. त्यावेळी आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले होते ‘या जगात अतिशय चांगले असणे खरंच चांगले नाही.’

अशा महात्म्यास कोटी कोटी प्रणाम!

      अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


CLICK HERE



Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...