Skip to main content

साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा

 


अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा  

साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा

खेलेगा भारत, तो खिलेगा भारत

मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आपण यंदा २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांची ११५ वी जयंती साजरी करीत आहोत. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस देशात ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व प्रकारच्या खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे.

व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक तसेच शारीरिक श्रम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच आत्मविश्वास, निरोगी शरीर, एकाग्रता, कार्यकुशलता, सकारात्मकता, सहनशीलता, सहकार्य करण्याची वृत्ती, सांघिक वृत्ती, खिलाडू वृत्ती, स्पर्धात्मक वृत्ती, नेतृत्त्व आदी सर्व गुणांचा विकास करण्यासाठी ‘खेळणे’ आवश्यक आहे.

आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूपच कमी महत्त्व दिले जाते. परिणामी लोकसंख्येचा विचार करता ऑलम्पिक स्पर्धेत पारितोषिके मिळविण्याचे प्रमाण फारच कमी आहे. आपल्या एखाद्या राज्यापेक्षाही लहान असणारे देश अनेक सुवर्णपदके पटकावितात, असे का होते?

कोणत्याही खेळात नैपुण्य संपादन करावयाचे असल्यास योग्य सराव, चिकाटी, इच्छाशक्ती, परिश्रम, मार्गदर्शन, संतुलित आहार, सकारात्मक दृष्टीकोन, व्यायाम, पाठिंबा, आवश्यक साहित्य व साधने, मैदानाची उपलब्धता, पुरेसे आर्थिक पाठबळ आदींची आवश्यकता असते.

केवळ खेळावर उपजीविका करता येत नाही हा एक गैरसमज आपल्यात आहे, म्हणून नोकरी करून उरलेल्या वेळात खेळाचा सराव करत पारितोषिकांची प्राप्ती कशी होणार? आपल्या मनात असलेली खेळाविषयी ‘नकारात्मक मानसिकता’ या अपयशाला कारणीभूत ठरत आहे. यात केवळ सरकारवर संपूर्ण अवलंबून राहणे योग्य नाही.

मुकाट्याने शाळा शिक आणि नोकरी कर ऐवजी मुकाट्याने खेळायला जा आणि प्राविण्य मिळव असे म्हणायची आज वेळ आलेली आहे, असे आपणास वाटते का?

साप्ताहिक शिक्षक ध्येय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच आमच्या व्हाटसअॅप ग्रुपला जॉइन व्हा...*

https://tinyurl.com/yb7kv6sp   

 

खालील लिंकवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून आपण अंक वाचू शकता....

 


Comments

Popular posts from this blog

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

  र कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२६   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय , साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ पाचव्या वर्षी ५ सप्टेंबर २०...

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...